मुरुड गांवात शिरल्याबरोबर समोरच दुर्गादेवीचं भव्य मंदिर दिसतं. पेशवेकालीन भव्य असलेल्या या मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे.
आत शिरल्यावर डावीकडे एक मोठी पितळी घंटा दिसते तिच्यावर पोर्तुगिज शब्द कोरलेले आहेत. आतमधील लाकडी खांब व वाशांवरील कोरीव काम खूप देखणं आहे. सध्या ऑइलपेंटने रंगवलेलं असलं तरी त्याचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाहीये. पैकी हत्तींची झुंज, भल्या थोरल्या नागाचं शिल्प बघणेबल आहे.
गाभार्यातील श्रीदुर्गादेवीची मूर्ती खूप सुंदर आहे.
मंदिरासमोर एक झिजलेला गधेगाळाचा दगड आहे. मंदिराच्या आवारातही आणखी छोटी मंदिरे आहेत. या दुर्गादेवी मंदिराच्या चौकातच महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे.
मुरुडच्या शाळेनं तीन भारतरत्ने निर्माण केली आहेत. पां. वा. काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर हे तिघेही या मुरुडच्या शाळेचे विद्यार्थी. मुरुड हे कर्वेंचं गांव. चौकाजवळच महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या वस्तू जतन करुन ठेवलेलं संग्रहालय आहे. महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहाचा योग ज्या वझे कुटुंबियांनी जुळवून आणला, त्या वझेंच्या आजच्या पिढीने स्व्तःच्या खाजगी जागेत हे स्मारक उभं केलेलं आहे. महर्षी कर्वेंच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू, जगातील नामवंत मंडळींसोबत असलेली त्यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या हस्ताक्षरातील कविता, त्यांच्या कार्याची ओळख व चरित्रपर माहिती येथे बघायला मिळते. येथे प्रवेश विनामुल्य आहे. या संग्रहालयाच्या मागील बाजूस वझेंचं सागरीका रिसॉर्ट आहे. (फोन नं. ०२३५८-२३४७३७) अगदी समुद्रकिनारी, नारळ-पोफळीच्या बागेत त्यांनी निवास व भोजनाची सोय केलेली आहे. आमच्यातील दोन आरंभशूर सदस्य मंदिर बघत असतांनाच आलेली बस बघून पळाली होती. आम्ही हे सगळं बघून सरळ रीक्षा करून पुन्हा जोशांच्या हॉटेलपाशी येऊन कळपांत सामिल झालो आणि सकाळची पोटपूजा करून घेतली.
आता टार्गेट मंडणगड. ..पण विनयच्या डोक्यात वाटेत लागणार्या पालगडाचा किडा (..की पालीची शेपूट!) वळवळत होता. पालगड गांवात गाडी घातली. स्थानिकांकडून गडाच्या वाटेबद्दल सामान्य ज्ञानाचा तास झाल्यावर लक्षात आलं की आत्त्ता हे होणे नाही. पालगड हे साने गुरुजींचं जन्मगांव. गांवात त्यांचं स्मारकही आहे. हम्म्म्म! पुन्हा कधीतरी!! आता मंडणगड... मंडणगड गावांत शिरतांना ड्रायव्हर केबिनमध्ये बसलेला मी, आपटेकाका आणि ड्रायव्हरने एक धमाल गोष्ट बघितली...
तलावाकडून दक्षिण टोकाकडे जातांना उजवीकडे एक देवकोष्ठासारखी कमान दिसते, ती कसली याचा मात्र उलगडा झाला नाही.
पुढे गेल्यावर एक टाकं आहे, तोफा आहेत. शिलाहार राजा भोजाने १२व्या शतकांत या किल्ल्याची उभारणी केली. १६व्या शतकांत अदिलशाहीकडे हा किल्ला होता. खोगिरासारख्या आकाराच्या गडफेरीला दिडेक तास पुरतो. उतरतांना पोटांत कावळ्यांचा डीजे चालू झाला होता, त्यांत त्रास म्हणजे त्या उन्हांत उतरतांना जेवणाचा माहित असलेला फर्मास मेन्यू डोळ्यासमोर नाचत होता. एकदाचे त्या हॉटेलात जाउन कोसळलो. तृप्त होऊन परतीच्या प्रवासात बसल्याबरोबर पुर्णब्रह्म अन्न डोळ्यांत उतरले. सुवर्णदुर्गाच्या सुवर्णमुलुखाची आलेली सुवर्णनशा घरी आल्यावरही तशीच होती... ! अजूनही अधूनमधून तरंगवतेय!!
maja aali. tuzhi shabda sampada jordaar aahe. aani kahi vakye tar khasach. पुर्णब्रह्म अन्न डोळ्यांत उतरले.
ReplyDelete